पंख पावसाळी
पंख पावसाळी
असं म्हणतात की सुख क्षणिक असते आणि दुःख अनंतकाळाचे असते. असेलही तसेच. पण आजूबाजूला असणारे हे आनंदाचे क्षण जरी वेचायला शिकलो तरी आनंतकाळच्या दुःखाचा विसर पडतो. हे क्षण इतके वेचावे की की त्यांची क्षणिकता जाऊन एक शृंखला तयार व्हावी. तशाच काही क्षणांना शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
पंख पावसाळी
रात्रीच्या प्रहरी
निखळता तारा
क्षणाची सोबत
आसमंती शहारा
निळ्या-तप्त नभी
शुभ्र एक मेघ
हाय रे! दिलासा
सावलीची रेघ
उभ्या पावसात
कोसळती वीज
डोळे पाणीदार
कातर-काळीज
अंतर क्षणाचे
कळी होते फुल
क्षण असा यावा
नी पडावी भूल
जातील गळुनी
पंख पावसाळी
शेवटाचे जरी
उड्डाण आभाळी
- अमोल मांडवे
Khup chan sir
ReplyDeleteखूप सुंदर रचना आहे सर
ReplyDeleteMast mast sir
ReplyDeleteखूप सूंदर कविता सर जी
ReplyDelete👌🏽
ReplyDeleteKhupch chan😊
ReplyDelete👌🏾👌🏾
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteVery nice thought sir,
ReplyDeleteNo words to say, khup sundar 👍🏻
ReplyDeleteKhup chan sir Sundar
ReplyDeleteफार अप्रतिम सिर
ReplyDeleteफार अप्रतिम सर..
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteफारच सुंदर सर
ReplyDeleteKhup chan sir
ReplyDeleteमंसतच सर
ReplyDeleteमस्तच ...
ReplyDeleteNice 👌
ReplyDeleteअप्रतिम कविता...💐💐
ReplyDeleteवाह! अतिशय सुंदर पद्धतीने, मोजक्या शब्दांमध्ये आयुष्यात येणार्या क्षणिक सुखाची शृंखला मांडली आहे सर. प्रत्येक कडव्यात येणारे उदाहरण संपूर्ण दृष्यच डोळ्यापुढे उभे करते..तुटणारा तारा, पांढरा शुभ्र मेघ, कोसळणारी वीज, उमलणारी कळी आणि सरतेशेवटी गळून पडणारे पंख पावसाळी! आयुष्यातील अनेक गोष्टी या क्षणिक असून सरणार्या आहेत. या गोष्टीची एक सुंदर माला आठवणीत तिचा सुगंध बहरत ठेवते यात शंकाच नाही... आपण मात्र हे निसर्ग सौंदर्य साठवून ठेवण्यास कमी पडतो. आपल्या या कवितेने पुन्हा एकदा या पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य डोळ्यात भरून ठेवायला सुचवले हे नक्की. अप्रतिम काव्यासाठी धन्यवाद सर... आणि पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!
ReplyDeleteThank You so much
Deleteअप्रतिम रचना अमोल 👌👌👌
ReplyDeleteसुंदर निसर्ग कविता.. खूप छान सर
ReplyDeleteYour poetry mesmerized me. You have a great flow in words. A perfect choices of words and you pour your all feelings in it. Keep writing ✍️
ReplyDeleteKhupach cchan sir
ReplyDeleteअप्रतिम सर
ReplyDeletekosalti vij... dole panidar... waah sundar kavita Sir.
ReplyDeleteआधी तर तुमच्या वाटाड्या या शब्दाबद्दल असणाऱ्या भावना आणि त्या स्पष्ट करणारे शब्द यांचे कौतुक करतो.
ReplyDeleteपंख पावसाळी..., आयुष्य जगत असताना घडणाऱ्या घटना, येणारे प्रसंग, भेटणाऱ्या व्यक्ती आणि सुख दुःख यांची सांगड घालून मार्गक्रमण करावे लागते. या सर्व गोष्टींचा सार आपल्या कवितेतून व्यक्त होतो. हे सगळे मांडताना शब्दांची अचूक निवड, यमक जुळणी, आणि लयबद्ध उतरण ही फार प्रेमाने जपली आहे आपण. निखळता तारा, आसमंती शहारा, शुभ्र एक मेघ,सावलीची रेघ वाह किती अप्रतिम वाचतच राहावे आणि सारी अनुभूती घ्यावी असच वाटत राहते.
कळीचे फुल होतांना ते क्षणाचे अंतर आणि ती पडणारी भुल. नक्कीच या कवितेने खूप वेळ घेतला असेल आणि तो सत्कारणी लागला. आमच्या सारख्या वाचकांना एक उत्कृष्ट कविता वाचनात भेटली. अप्रतिम भावना व्यक्त करणारे आणि विचार करायला लागणारे शब्द.... अझहर.....
Thank you so much
Deleteवाह ! अप्रतिम रचना...👌👌👌
ReplyDeleteमनाला भावणारे शब्द... सुंदर 👌👌
ReplyDeleteKhup sundar 👌🏻
ReplyDeleteApritam rachna sir 👌🏻
ReplyDeleteApritam rachna sir 👌🏻
ReplyDelete