Posts

Showing posts from August, 2018

यश आणि अपयश कसे स्वीकारावे

                यश आणि अपयश कसे स्वीकारावे       महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही हजार विद्यार्थ्यांमधून 1 जण, असे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. म्हणजे तसे पहिले 99.9 % विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की "अनुत्तीर्ण" विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी जास्त असले तरी "अपयशी" विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. अनुत्तीर्ण म्हणजे अपयशी हे समीकरण इथे लागू पडत नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्यसेवेतून चांगली पदे मिळवतात, राज्यसेवेत यश न मिळालेले इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर आज अनेक जण बँकिंग, journalism, education या क्षेत्रात प्रचंड यश संपादित करत आहेत. तर अनेक जण यशस्वी उद्योजक आहेत. आणि ते अगदी सहज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना अपयशी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान, आलेली प्रगल्भता ह