स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE
स्पर्धापरीक्षा आणि अनियमितता: PERSPECTIVE कोरोना मुळे सर्वच गोष्टी मध्ये तात्कालिक, तात्पुरते ही असतील परंतु अमूलाग्र बदल झाले. कधीही कल्पना न केलेल्या गोष्टी आपण सर्वांनी पाहिल्या, अनुभवल्या, त्यांना सामोरे गेलो. जन्म ही न झालेल्या बालकांपासून ते मृत्यूशय्येवरील वृद्धांपर्यंत सर्वांचे जीवन अपार ढवळून निघाले. परंतु ऐन उमेदीच्या वयातील तरुण तरुणींसाठी हा काळ मोठेच आव्हान घेऊन आला. त्या आव्हाणांच्या एका पैलूंवर थोडंसं लिहावं वाटलं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग आणि त्याकडून आयोजित परीक्षांना अनियमिततेचा एक साग्रसंगीत इतिहास आहे. एकच परीक्षा प्रक्रिया पूर्ण व्हायला पाच पाच वर्षेही लागलेली लोकांनी अनुभवली आहेत. मधल्या काळात काहीशा नियमित झालेल्या परिक्षांनातर जे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आले त्यांना ती अनियमितता पचवणे अवघड आहे. आणि आताची पिढी अशी अनाहूत, गबाळी, अगदी ओंगळवणी अनियमितता सहन करणार ही नाही. नुकतेच कुठे ही नियमितता अंग धरू लागली होती की आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्वच वेळापत्रक कोलमडले. अजून तो गुंता नक्की कसा आहे ते कळायचं होतं, त्या अगोदर च