Posts

पंचवीस पैशाचं कोरं पत्र

Image
                        पंचवीस पैशाचं कोरं पत्र                            पाच पैशाला बऱ्याच 'बारक्या' गोळ्या मिळणाऱ्या वेळेची गोष्ट आहे बरं का. त्यामुळे 25 पैशाची किंमत नका करू. आणि असंही, नाही करता येणार आपल्याला त्या पत्राची किंमत. मला काय तेंव्हा येत नव्हती कोणाची पत्रं, आणि मला पत्र येण्याची वेळ येण्याआधीच या पोस्ट कार्डाचा काळ लोटूनही गेला होता. वाळू मुठीत धरली की थोड्या वेळात ती निसटून जाते हातातून, पण काही क्षणांकरिता झालेली वाळूच्या स्पर्शाची अनुभूती रहातेच आपल्याकडे. हे पोस्ट कार्ड मात्र हातात येण्याआधीच निसटून गेलं असेल अनेक जणांच्या. तो काळंच बरंच काही न मिळण्याचा होता. म्हणूनच कदाचित 'समाधानी' वृत्तीचा होता.         आमच्यात कामाला येणाऱ्या कमलाबाईने तिच्या मुलींची लहानपणीच लग्नं लाऊन दिली म्हणून शेम्बुड पुसायचं कळत नसताना देखील तिची अक्कल आम्ही काढायचो. चार मुली पोटाला आल्या म्हणून लहान वयातच त्यांची लग्नं लाऊन देणाऱ्या मजुरी करण्याऱ्या आईची अगतिकता या 25 पैश्याच्या पोस्ट कार्ड नेच आम्हाला सांगितली. एखाद्या दिवशी कामावरून आलं की ती हातात एक कोरं

अंघोळीच्या पाण्याची चूल

Image
                      अंघोळीच्या पाण्याची चूल ( Sketch Credit:- To the dear friend with magical skills Amol Bhosale. Great pencil work🙏 )          घराबाहेर न्हाणीच्या भिताडाला लागूनच मातीनं लिपलेली विटांची चूल. पहाटे केंव्हातरी(अलार्म च्या दुनियेपासून लांब) दोन पावलं पेंडंची किटली घेऊन घराबाहेर पडायची आणि दुसरी दोन पावलं घराला वळसा घालून मागच्या दाराला जाऊन, खाली लाकडाची एक ढपली लाऊन त्यावर चिपाडं ठेऊन अंघोळीच्या पाण्याची चूल पेटवायची. आणि त्या उबीत हळू हळू घराला जाग यायची. पेटवताना चुलीवरचं भगुलं मोकळंच असायचं. त्या पावलांनी संसार सुरु केला तेंव्हा पण असाच मोकळा होता की. जाळ एकदा लागला की मग कळशीनं पाणी आणून आई ते भगुलं भरायची. पुढं तिनं असाच संसार पण भरून टाकला सुखानं, समृद्धीनं. पारूसं झाडून काढे पर्यंत आणि परसाकडं जाऊन येईपर्यंत पाणी तापायचं. अंघोळ केल्याशिवाय आईला दुसरं कुठलं काम करवत नसायचं. म्हणजे अंघोळीची चूल पेटल्याशिवाय भाकरीची चूल काय पेटायची नाय.             तिला अंघोळीला पाणी काढून आई दीदी साठी पाणी ठेवायची आणि जाळ घालून ठेवायची. त्यो घातलेला जाळ विझायच्या आत

GROUP DISCUSSION का आणि कसे करावे?

Image
       GROUP DISCUSSION का आणि कसे करावे.           स्पर्धा परीक्षा म्हणलं की प्रचंड अभ्यासक्रम आणि त्यात प्रत्येक विषयाची अनेक पुस्तके आलीच. त्यात एकामागून एक धडकणाऱ्या परीक्षा आणि त्यांचे विविध टप्पे म्हणलं की अभ्यास म्हणजे एक मोठी मोहीम ठरते. आणि ती एकदा फसत गेली की तीन चार वर्षे प्रयत्न करूनही पार पडत नाही. म्हणून अशा वेळी चांगले सोबती असतील तर वाट जरा सोप्पी होते. अभ्यास सुसह्य होतोच होतो पण तो परिणामकारक देखील होतो. अशा वेळी गट चर्चा(group discussion) अत्यंत उपयोगी पडते. Group Discussion का महत्वाचे आहे?         MPSC च्या सगळ्या परीक्षा objective झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा factual गोष्टी, आकडेवारी, नावे या गोष्टींवर भर असतो. त्यातही बऱ्याच गोष्टी प्रथमदर्शनी एकसारख्या असतात. ऐन परीक्षेत नक्की कशात काय हेच कळत नाही आणि मग confidence जातो. सगळं वाचलंय असं वाटतं पण नक्की हेच का? किंवा मग हे याच्यातच आहे का? असे प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, सामान्य ज्ञान पेपर-२  मध्ये काही विशेष कायदे अभ्यासाला आहेत त्यांची कलमे नक्की कोणती कोणाची हे लक्षात ठेवणे अवघड जाते. किंवा सामान

यश आणि अपयश कसे स्वीकारावे

                यश आणि अपयश कसे स्वीकारावे       महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे किंवा संघ लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये काही हजार विद्यार्थ्यांमधून 1 जण, असे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. म्हणजे तसे पहिले 99.9 % विद्यार्थी अनुत्तीर्ण होतात. पण इथे लक्षात घ्यायची गोष्ट अशी की "अनुत्तीर्ण" विद्यार्थ्यांचे प्रमाण जरी जास्त असले तरी "अपयशी" विद्यार्थ्यांचे प्रमाण मात्र अतिशय कमी आहे. अनुत्तीर्ण म्हणजे अपयशी हे समीकरण इथे लागू पडत नाही. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी राज्यसेवेतून चांगली पदे मिळवतात, राज्यसेवेत यश न मिळालेले इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवतात. आयोगाच्या परीक्षांच्या अभ्यासाच्या जोरावर आज अनेक जण बँकिंग, journalism, education या क्षेत्रात प्रचंड यश संपादित करत आहेत. तर अनेक जण यशस्वी उद्योजक आहेत. आणि ते अगदी सहज आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासादरम्यान मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून घेताना दिसतात. त्यामुळे अशा लोकांना अपयशी म्हणता येणार नाही. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातून मिळालेले ज्ञान, आलेली प्रगल्भता ह

मावळतीचे रंग

Image
                               मावळतीचे रंग                     (Sketch credit: AMOL BHOSALE, DSLR THANK YOU FOR COLOURFUL SKETCH☺)       गावाला गेलो की रानातला जनावरांचा गोटा सावलीखाली घेऊन उभ्या असलेल्या लिंबाच्या झाडाखाली बसून मावळणारा सूर्य पाहण्याचे माझे वेड फार जुने आहे. आयुष्याच्या शेवटी सगळ्या गोष्टींमधला फोलपणा कळल्यावर माणूस शांत होऊन जातो आणि तरी त्याच्या चेहऱ्यावर मोक्षप्राप्ती सारखे एक विलक्षण तेज असते. मावळतीचा सूर्यही काहीसा तसाच वाटतो. डोक्यावर सूर्य तळपत असताना तो कधी पुढे सरकतोय अशी वाट पाहणारी माणसं, डोळ्यासमोर काही क्षणात डोंगराआड सरकणाऱ्या मावळतीच्या सूर्याने मात्र थोडेसे तरी रेंगाळावे अशी आशा ठेऊन असतात. आयुष्यभर भविष्याची चिंता करत दगदग करून घेणारे म्हातारे जीव सरते शेवटी उगाच जीवाला कवटाळून बसतात, आणखी काही वाढीव क्षणांच्या आशेवर. सुख कशात आहे हे तेंव्हा कळतं पण वळायला मात्र वेळ नसते राहिलेली. सूर्य डोंगराआड गेल्यावर अगदी तशीच हळहळ वाटते. पण फक्त काही क्षण. नंतर रात्रीच्या विलासी अंधारात हरवून जातो आपण.         मावळतीला पश्चिमेला रंगांच्या छटा म

कबुली जबाब

Image
                    कबुली जबाब             (Sketch credit- Amol Bhosale, DSLR) पाऊस पण आता तुझ्याकडेच पडला माझ्याकडे येणारा ढग दारातच अडला त्यालाही भीती वाटली असेल, माझ्यासारखं चार भिंतीत अडकला तर? की बघवली नसेल माझी असहाय्यता, पावसात मनाचा माझ्या बांध फुटला तर? वाट तर मीही पहात होतोच की, पण कोणाची- पावसाची की तिची? पाऊस येणार, पाठोपाठ तिची आठवण वैतागला असेल का यावेळी पाऊस पण? पावसाशिवायपण आठवण आलीच की बेभान गतीच्या कोरड्या वावटळीसारखी "तुझ्याकडे पाठवतेय रे पाऊस", स्वतःवरच्या अजून एका कवितेचा मोह तिचा. पावसाबरोबर तिलाही मीच आठवतो, उघड उघड कबुली जबाब तिचा.             - अमोल मांडवे(ACP/DYSP)©

10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?

Image
10वी 12वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करावी का?                         १०वी आणि १२वी चे निकाल नुकतेच लागले आणि पुढे काय हा प्रश्न विद्यार्थ्यांना आणि त्याहून जास्त त्यांच्या पालकांना पडला. बऱ्याच जणांचे फोन आले. या सगळ्यात एक खटकणारा प्रश्न विचारला जात होता. "माझ्या मुलाला/मुलीला स्पर्धा परीक्षा करायची आहे मग कोणत्या शाखेला प्रवेश घेणे योग्य राहील?" "स्पर्धापरिक्षेसाठी आत्तापासून काय तयारी करावी लागेल?" खरे तर या गोष्टी ज्याच्या त्याने ठरवायच्या. पण याबाबतीतील गोष्टींबाबत माझी काही मते आहेत, त्यांचा केलेला हा उहापोह. विद्यार्थ्यांची स्वतः निर्णय घेण्यास असमर्थता:          सर्वात अगोदर लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे १०वी १२वी च्या फार कमी मुलांना आपल्या भविष्याचा निर्णय घेण्याइतके ज्ञान किंवा अनुभव असतो. त्यामुळे यावेळचे निर्णय बऱ्याचदा पालकांनी घेतलेले किंवा ऐकीव गोष्टींवरून घेतलेले असतात. त्यामुळे पुढे जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वेगळी आवड निर्माण होऊ शकते. अशावेळी अपुऱ्या माहितीवर अगोदर घेतलेले निर्णय अडचणी निर्माण करू शकतात. अशावेळी सर्व क्षेत्रातील स्पर्धेमुळे

जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)... १. बाळाचे पाय..गदालोटचा पहिला डाव

Image
जगावेगळी माणसं- विजय चौधरी(ट्रिपल महाराष्ट्र केसरी)          १. बाळाचे पाय..... गदालोटचा पहिला डाव                                     अस्लम काझी. नावातच दरारा. ते कमी का काय म्हणून असतानाच आडदांड पैलवान आणि तरीपण वाऱ्यासारखा चपळ. पंचानं हातात हात दिला आणि पंच मागं सरला. तसा अस्लम लक्खकण खाली वाकला आणि दोन मुठी भरून माती पुढच्या पैलवानाच्या खांद्यावर आन पाठीवर टाकली. पुढं कोण होता? पोरकट दिसणारा, दाढी वाढवलेला, सहा फूट उंचीचा देखणा पण कवळा पैलवान. गांगरलेल्या पुढच्या पैलवानानं पण अस्लम काझीनं केलं तेच करायचं म्हणून मुठी भरल्या. माती अंगावर पडल्यावर काझी न असं गदागदा सगळं धूड हालवलं ना. माती काय चिटकल अंगाला. ह्यो तर माती अंगाला लागून दिना, ह्यो काय पाठ लागू देणार मातीला? बोटात बोटं फसली, ताकद आजमावायला सुरुवात झाली. समोरचं पोरगं बघून अस्लम चांगलाच चेकाळला. डोळ्याच्या एका कोपऱ्यातन त्यानं गदेवर आणि गर्दीवर नजर फिरवली. आणि दुसऱ्या सेकंदाला डावा हात गर्रदिशी फिरून पुढच्या पैलवानाच्या उजव्या कानावर बसला. सनक डोक्यात गेली आणि कान बधिर झाले. बरंच झालं, नाहीतर मैदानातल्या प्रेक्

Life is to Whistle and not to Run

Image
           Life is to whistle and not to run   It was not as if he didn't know his place. The only thing he dreamed of was to move along the train and to whistle with it.          Road to his home ran besides the old rail track. He grew up waking up by the shudder of train passing over the narrow bridge, under which lived the boy, all by himself. Life finds the way and that is the only reason he lived. How many infants abandoned on rail track would live, tell me?          Nobody taught him anything. No mother to teach words, no father to let support of finger while he learned to stand up, no neighbours to teach how to behave, no sister to teach sharing, no brother to teach jealousy, no grandparents to teach love. If he had somebody to teach anything, it was the train and the bridge. And yet he learned well. The bridge taught him to stand all the pain when trains of disparity, of sorrow, of cruelty, of ignorance, of indifference, of hate passed over. And the train taug

©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे

Image
©राज्यसेवा : यशाची गुरुकिल्ली - माझ्या येणाऱ्या नवीन पुस्तकाबद्दल थोडेसे    जवळपास दोन वर्षे स्पर्धापरिक्षांचे विविध विषय शिकवण्याचा अनुभव असल्याने आणि नंतर DYSP/ACP पदी निवड झाल्याने अनेक विद्यार्थी अनेक शंका घेऊन भेटायचे, प्रश्न विचारायचे. बऱ्याचदा प्रत्यक्ष भेटून तर कधी फोन, फेसबुक, व्हाट्सअँप या माध्यमातून. शिकवण्याची आवड असल्याने अशा प्रश्नांची उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविणे हा माझ्या आवडीचा विषय होता.           परंतु DYSP म्हणून सेवेत रुजू झाल्यावर विद्यार्थ्यांना हवा तेवढा वेळ द्यायला जमेना म्हणून मग वाटाड्या(vataadya) नावाचा ब्लॉग लिहिणे सुरु केले. त्यामार्फत अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. परंतु तरीही या माध्यमाने सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. तसेच सर्व जणांच्या विचारल्या जाणाऱ्या शंकांचे समाधानही करता येत नव्हते. तेंव्हा महेश शिंदे सरांनी ही पुस्तकाची कल्पना सुचवली आणि मग आम्ही तात्काळ त्यावर काम सुरु केले.            अगदी राज्यसेवा करावी का असा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप दिवस असणाऱ्

स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4

© स्पर्धा परिक्षेची तयारी करताय, मग या गोष्टी टाळा:: भाग 4          आता झालेली पूर्वपरीक्षा व त्यामध्ये cutoff खूप जास्त जाईल अशी चर्चा. मग थोडेफार कमी मार्क्स पडलेल्या लोकांना पुढे काय करावे ते सुचतच नाही. तेंव्हा त्यांच्याकडून पुढे सांगितलेली चूक होऊ शकते. ते टाळण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा लेख. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना टाळायच्या गोष्टी संदर्भातील लेखमालेतील चौथा लेख.       4. परीक्षेच्या एका टप्प्यावर अयशस्वी झाल्यावर फक्त त्याच टप्प्यावर लक्ष केंद्रित करणे:-          स्पर्धा परीक्षेच्या प्रक्रियेत अपयश येणे हे अतिशय साहजिक आहे. अपयश ही यशाची पायरी आहे हे वाक्य स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला तंतोतंत लागू पडते. त्यामुळे अपयश पचवणे आणि त्यातून यशाचा मार्ग बनवणे हे या प्रक्रियेचा एक अविभाज्य आणि अतिशय महत्वाचा असा भाग आहे.           परंतु बऱ्याचदा या प्रक्रियेत एका टप्प्यावर अपयश आले की विद्यार्थी त्याच टप्यावर सगळे लक्ष केंद्रित करतात आणि मग परीक्षेच्या इतर टप्प्यांवर आपोआप दुर्लक्ष होते. उदाहरणार्थ जर एक जण पूर्व परिक्षेतच उत्तीर्ण होत नसेल तर तो पुढची पूर्व परीक्षा येण

ऋतु

Image
ऋतु तसा प्रेमाचा कोणताही ऋतू नसतो तरी अवकाळी ढग आठवांना धुमारे आणतातच हवेतील गारवा वाढू लागला की तिच्या स्पर्शाची ऊब प्रकर्षाने आठवते नव्या पालवीची सळसळ ऐकून पैंजनाची किणकिण अजून ऐकू येते पहिल्या थेंबाबरोबर येणारा मातीचा गंध त्या गच्च मिठीच्या आठवणीत विरतो पावसासाठी झुरणारी रानपाखरं पाऊस आल्यावर पानांआड अंग चोरतात पळत येऊन मिठीत शिरणारी जणू ती स्पर्शाबरोबर लाजून आरक्त होणारी काळ्याभोर ढगांनी अंधारून येतं डोळे मिटून मग स्पर्शानेच पाहणं होतं  कोसळणाऱ्या आभाळाला न जुमानता  स्वप्नांचे इमले च्या इमले उभे राहतात पण कडाडणाऱ्या विजांची नजर लागतेच गारांबरोबर स्वप्नांचे इमलेही कोसळतात पाऊस संपता संपता गारवा संपतो उरते नुसती धग, कासावीस करणारी या पावसात जन्मलेली गवताची पाती अंकुरतात, फुलतात, टिकून राहतात तुझ्यामाझ्यातल्या अंतराला न जुमानता जिवंत असणाऱ्या आंतरिक ओढीसारखी           -©अमोल मांडवे(DYSP/ACP)

लेखणीग्रस्त

Image
    लेखणीग्रस्त जुन्या कवितांनी अलवार माझाच खून केला नव्या कवितेचा उमाळा आतच जळून गेला पहिल्या कवितेने प्रेमवीर केलं       दुसऱ्या कवितेने जणू सर्वस्व नेलं तिसऱ्यात तर झाली अब्रुची लक्तरे   पेन ठेवतो, हाती पांढरं निशाण आलं प्रत्येक कवितेला हवीच का नायिका?    दरवेळी मीच ती जगायला हवीय का? वाचणाऱ्याच्या एखाद्या शाबासकीसाठी    दरवेळी बळी मी जायलाच हवाय का? नागड्या चेहऱ्याने वावरलो आजवर, परि माझ्या अभिव्यक्तीचे मुखवटे जड जाहले कवितांच्या थारोळ्यात रक्तबंबाळ नि सुन्न मी ते रुधिरही काहींनी रंग म्हणूनी फासले कवितेचे कागद फाडून टाकले तरी ठिगळ कसं लागायचं चारित्र्याचं फुटलेलं आभाळ शब्दांनी कसं सांधायचं. माझ्यातले उरलेले "मी" पण लटकवावे फासावर की, माझ्यांनीच माझ्या "मी" चे गळे आवळलेलं पहायचं.                          -अमोल मांडवे(DYSP/ACP)

CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन

Image
            CSAT प्रत्यक्ष पेपरच्या 2 तासांचे नियोजन                           अगदी 100% विद्यार्थी मन लाऊन अभ्यास करत नसले तरी 70-80% तरी अगदी मन लाऊन अभ्यास करतात. सगळा syllabus पूर्ण करतात, अगदी काही लोकांची तर पुस्तकं च्या पुस्तकं पाठ असतात. काहीही विचारा उत्तरं त्यांच्या जिभेवर असतात. एक एक विषय दहा-दहा, पंधरा-पंधरा वेळा वाचलेले लोकं असतात. परीक्षा पास होण्यासाठी लागतो त्याच्या कित्येक पट जास्त अभ्यास झालेला असतो अनेकांचा. पण एवढं सगळं असून यातील बरेच जण अंतिम यादीत मात्र नसतात. पूर्व परीक्षेचा पहिला टप्पाच अनेकांना अनेक वर्षे पार करता येत नाही.           काय चुकते नक्की? अभ्यास कमी असतो का? की गरजेपेक्षा जास्त अभ्यास होतो? की केलेल्या अभ्यासाचा योग्य वापर करायचे चुकते? की परीक्षेच्या वेळच्या तणावामुळे अडचणी येतात? परीक्षेची आणि निकालाची भीती इथे प्रॉब्लेम करून जाते का? की ऐन वेळी वेळेचे गणित चुकते? की गोंधळ उडतो अनेक गोष्टी एका वेळी सांभाळता सांभाळता?           यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे लपली आहेत तुम्ही परीक्षेचा दिवस आणि परीक्षेचे दोन अधिक दोन असे चार तास